अठराव्या शतकाच्या मध्यात नवाब व राजे यांची शक्ती संथपणे कमी होऊ लागली होती. आणि समाजातील सन्मान देखील कमी होत होता. बऱ्याच दरबारात ब्रिटिश प्रतिनिधी ठेवण्यात आले होते. त्यामुळे नावांच्या आणि राज्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली. अनेक नावांनी व राज्यांना सैन्य ठेवल्यावर व सैन्य ठेवण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आणि कर व राज्याचा भूभाग हे ब्रिटिशांकडून घेण्यात करण्यात येऊ लागले. सर्वात प्रथम अवधे तील राज्य खालसा करण्यात आले. 1801 मध्ये अवध येथे तैनाती फौजेचा करार करण्यात आला त्यानंतर 1856 मध्ये अवध हे संस्थान खालसा करण्यात आले. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी अवध प्रदेशाचा राज्यकारभार योग्य रीतीने चालत नसल्याने आणि व्यवस्थित प्रशासन स्थापित करण्याच्या दृष्टीने तेथे ब्रिटिश शासन अमलात आणायला हवे असे कारण देत अवधेश संस्थान खालसा केले.
जीवन मराठी: राज्य व तिथे राहणाऱ्या जमाती | स्पर्धा परीक्षेच्या... https://t.co/y3EU5V4Pw1
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019