
मुंबई, दि.१६ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ६२९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ५४९ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १५ जुलै या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१३ (८७९ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार १९४
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४४
जप्त केलेली वाहने – ९२ हजार ०७६.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८२
(मुंबईतील ४५ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५, ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ जालना ग्रामीण १, अमरावती शहर १, उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी १ पोलीस, औरंगाबाद शहर-१)
कोरोनाबाधित पोलीस – १५८ पोलीस अधिकारी व ११२३ पोलीस कर्मचारी
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता