
मुंबई दि.११ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ६४ हजार १६० गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८० हजार ७६९ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १० जुलै या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३०८ (८६७ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०६ हजार ५११
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ९० हजार ७३.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ७५
(मुंबईतील ४३ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४६, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५, ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १, जालना एसआरपीएफ १, अमरावती शहर १, उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी)
कोरोना बाधित पोलीस – १३० पोलीस अधिकारी व १०२७ पोलीस कर्मचारी
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता