
१ लाख ३९ हजार गुन्हे दाखल ; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई दि. ३० : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ५२ हजार ६६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख १६ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ३६ हजार ३२४ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ३० जून या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९० (८६० व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०५ हजार २६९
पोलिसांनी हातावर क्वारंटाईन शिक्का मारून विलगीकरणात पाठविलेल्या–७५६.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८५ हजार ७८०.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ६०
(मुंबईतील ३७ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ३, ठाणे ग्रामीण १ पोलीस, २ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)
सध्या 124 पोलीस अधिकारी व 941 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोना बाधित पोलीस – १२८ पोलीस अधिकारी व ९७५ पोलीस कर्मचारी
राज्यातील एकूण रिलिफ कँप – १० (९८ लोकांची व्यवस्था)
सोशल डिस्टेन्सिंग पाळा
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
0000
वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता