बारावी परीक्षेचा निकाल आज लागला तर या HSC Result बाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप / तक्रार असतील तर त्या नोंदवण्यासाठी; त्यांचे निराकरण करण्यासाठी msbshse कडून विभागीय स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. 

🥏 *जीवन मराठी* चे अपडेट्स मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर तेही अगदी मोफत
http://bit.ly/Join_Jeevan_Marathi_Whatsapp_Updates
लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.

📌दहावीनंतर बारावीच्या resultने सर्व विक्रम मोडीत काढत राज्य मंडळाचा २०२१ चा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.

📌महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांअंतर्गत घेतल्या जाणा-या बारावी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी जाहीर केला.

📌यावर्षी कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे  दहावी,अकरावीचे गुण आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल प्रसिध्द करण्यात आला.

📌त्यामुळेच, या निकालाबाबत विद्यार्थी अथवा पालकांना आक्षेप असल्यास तक्रार नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे.

📌स्वत: शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करुन संबंधित विभागीय कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.