India vs Bangladesh Wcup 2023: भारत विरुद्ध बांगलादेश या झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये बांगलादेश ने भारताला विजयासाठी 257 धावा चे लक्ष्य दिले होते. ह्या 257 धावांना पूर्ण करत असताना विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताला विजयाजवळ आणले. 
भारताला 26 धावांची गरज असताना विराटला ही त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी तेवढ्याच धावा हव्या होत्या. यावेळी विराटने 103 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र अंपायर रिचार्ड केटलब्रो यांनी एका वाईड चेंडूला वाईड न  दिल्याने विराटने त्याचे शतक पूर्ण केला असल्याचा चाहत्यांना वाटत आहे. सोशल मीडियावर अंपायरचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे मात्र अंपायर रिचर्ड यांच्या या निर्णया मागे सध्याच्या नवीन नियमावलीचा आधार असल्याचा समोर येतय.
header ads

भारत विजयाच्या उंबरठ्यावर तर विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर होता.  नसूमने 42 वी ओवर टाकत असताना वाईड बॉल टाकल्याने विराटचे शतक पूर्ण होता होता राहिले असते. याचवेळी अंपायरने तो बॉल वाईड दिला नाही. त्यावेळी विराटला शतकासाठी तीन धावा तर भारताला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. विराटने षटकार मारून भारताच्या विजयासोबत शतक देखील पूर्ण केले. के एल राहुल याने 34 धावा करत विराट कोहली सोबत खेळी पूर्ण केली. भारताने सात गडी राखून 261 धावा पूर्ण करत 41.3 षटकांमध्ये विजय मिळवला. 

पंचांचा तो निर्णय विराटचे शतक पूर्ण होण्यासाठी कारणीभूत असल्याचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंपायरने विराटच्या शतकासाठीच तो चेंडू वाईड दिला नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र यामागे एमसीसीच्या नवीन नियमावलीचा दाखला देण्यात येत आहे त्यामुळे काही समीक्षकांकडून पंचांच्या निर्णयाचं समर्थन केलं जातंय.
header ads

एमसीसी ने मार्च 2022 मध्ये क्रिकेट संबंधित नवीन आचारसंहितेची घोषणा केली होती. ही आचारसंहिता एक आक्टोंबर पासून सर्वत्र लागू करण्यात आली. त्यामध्ये 22.1 हा नियम वाईड चेंडू संदर्भात होता. खंड 22.1.1 जर एखादा गोलंदाज चेंडू फेकतो आणि नो बॉल नसेल तर अंपायर वाईट देऊ शकतो. 22.1.2 च्या नियमावलीनुसार, चेंडू हा स्ट्रायकर उभारल्याचा जागेपासून दूरुन जाते आणि गार्ड स्थितीत उभा असलेल्या स्ट्रायकरपासूनही दूर जाते.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत तर कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतले.
लिटन दास (66), तनझीद हसन (51), महमुदुल्लाह (46) व मुश्फिकर रहिम (38) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने 8 बाद 256 धावा केल्या होत्या.