इंडिया वस इंग्लंड भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम लखनऊ येथे आजचा सामना होणार आहे. आज दुपारी दोन वाजता(ind vs eng timing) या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी भारताचा कॅप्टन रोहित शर्मा(Rohit Sharma) टीम इंडिया मध्ये काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Team India Playing XI
हार्दिक पांड्या दुखापतीने ग्रस्त आहे तर दुसऱ्या बाजूला शार्दुल ठाकूर खराब फॉर्म मध्ये दिसत आहे आणि यामुळे न्यूझीलंड विरुद्ध सामन्यांमध्ये दोघांना बाहेर बसवण्यात आलेलं. न्युझीलँड विरुद्ध मॅच मध्ये मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव या दोघांना संधी देण्यात आली होती. यापुढील तीन सामने हार्दिक पांड्या खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केला आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध सामन्यांमध्ये जी न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात उतरवण्यात आलेली प्लेइंग इलेव्हन ची टीम होती तीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय संघाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांनी प्लेइंग इलेव्हन बद्दल एक सल्ला दिलेला आहे. लखनऊ येथील पीच ही स्लो असून फिरकीला साथ देते.(ind vs eng pitch report) त्यामुळे टीम इंडिया मध्ये तीन फिरकी गोलंदाज समावेशित करावेत असा सल्ला हरभजन सिंग दिला आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या जोडीला आर आश्विनला संघात घेण्याचा सल्ला हरभजन सिंग ने दिला. मोहम्मद सिराज ला आराम द्यावा असेही त्यांन सांगितला आहे. तर हरभजन ने हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या दोघांना संघामध्ये कायम ठेवा असा सल्ला दिला आहे.(ekana sports city lucknow pitch report)
मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव संघामध्ये
हार्दिक पांड्या दुखापतीने त्रस्त झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव(suryakumar yadav)ला संधी देण्यात आली होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच मध्ये सूर्यकुमार यादव केवळ दोन धावा करून रन आउट झाला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यात धाव घेत असताना गैरसमज झाल्याने सूर्यकुमार यादव दुर्देवी रित्या रन आऊट झाला. अन त्यामुळे सूर्यकुमार यादवचं पदार्पण दुर्देवी ठरलं. पण इंग्लंड विरुद्ध सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव ला पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता आहे. या वर्ल्डकप मध्ये पहिल्याच सामन्यांमध्ये पाच विकेट घेणारा मोहम्मद शमी आपली जागा संघामध्ये पक्की करू शकणार आहे.
भारत-इंग्लंड हेड टू हेड
England Cricket Team आणि भारत या दोन संघांच्या दरम्यान आतापर्यंत 106 सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी भारतानं 57 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर इंग्लंडने 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामने टाय झाले आहेत. वर्ल्ड कप मध्ये मात्र इंग्लंडचा पारडं जड दिसलेला आहे वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात आठ सामने खेळले आहेत. यामध्ये तीन सामने भारत तर चार सामने इंग्लंड जिंकला आहे तर एक सामना टाय झाला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड या वर्ल्डकप मध्ये कोणाचं पारडं जड?
World Cup 2023 23 मध्ये भारतीय संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे तर इंग्लंडचा संघ देखील पाच सामने खेळला आहे यामध्ये भारतीय संघ सलग पाचशे सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे मात्र इंग्लंडचा संघ पाचपैकी चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. त्यांना केवळ एका सामन्यांमध्ये जिंकण्याची कामगिरी करता आली आहे. गुगल वर दिलेल्या प्रेडिक्शन नुसार टीम इंडियाला 66% जिंकू शकतो असं वर्तवण्यात आलं आहे.
भारताची संभाव्य Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह,कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.(ind vs eng dream team)