Hum Dil De Chuke Sanam: 24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटाची गोष्ट, एक-दोन नव्हे तर तब्बल 5 अभिनेत्यांनी चित्रपट नाकारला.
आपण बॉलीवूडबद्दल बऱ्याचदा अनेक गोष्टी एकतो त्या म्हणजे एखाद्या चित्रपटासाठी अमूक कलाकार निर्मात्यांची पहिली पसंती होता, पण त्याने नकार दिल्याने दुसऱ्याची वर्णी लागली आहे.
एक ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास नुकत्याच एका मुलाखतीत ‘रामलीला’ चित्रपटा बद्दल रणवीर सिंग(Ranvir Singh) खुलासा केला होता की लीलाच्या भूमिकेसाठी करीना कपूरला(Karina Kapoor) घेण्यात आलं होतं, पण करीनाने ऐनवेळी सिनेमा सोडला त्यामुळे तिच्या जागी दीपिका पदुकोणला संधी देण्यात आली होती.
एक सुपरहिट चित्रपटच्या बाबतीतही म्हणजे 24 वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमाला देखील असंच घडलं होतं. या चित्रपटातील एक भूमिका करण्यास एक-दोन नाही तर तब्बल पाच अभिनेत्यांनी नकार दिला होता. ती भूमिका करण्यासाठी अखेर सहाव्या अभिनेत्याने स्वीकारली. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगन होता. अजयच्या भूमिकासाठी या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी आघाडीच्या अभिनेत्यांशी संपर्क केला होता पण त्या सर्व अभिनेत्यांनी त्या भूमिकेसाठी नकार दिला होता.
या चित्रपटात सलमान खान व ऐश्वर्या रायची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमा ऐश्वर्याचा पती वन राजाची भूमिका अजय देवगन ने केली होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भूमिकाची ऑफर संजय दत्त, शाहरुख खान, अनिल कपूर, अक्षय कुमार आणि आमिर खान या पाच अभिनेत्यांना करण्यात आली होती. विविध कारणांमुळे या सर्व कलाकारांनी ही ऑफर नाकारली होती. शेवटी अजय देवगन ची संजय लीला भन्साळीनी संपर्क साधला. ही भूमिका आनंदाने अजयने स्वीकारली होती. ‘डीएनए’ने याबद्दल वृत्त दिलंय.
अवघ्या १६ कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. प्रेक्षकांना या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची कथा खूप आवडली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर तब्बल ५२ कोटी रुपये त्या काळी या चित्रपटाने जगभरात कमावले होते. अनेक कलाकारांनी नाकारलेल्या या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन,सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी,सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पटकावले होते. या सिनेमाची २४ वर्षांनंतरही तितकीच चर्चा होताना दिसते. असं म्हटलं जातं की, या चित्रपटानंतर ऐश्वर्या व सलमान एकमेकांच्या प्रेमात पडले होते.