'Tiger 3' movie: ‘टायगर ३’ हा चित्रपट अजिबात पाहू नये या ४ गोष्टीमुळे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया त्या ४ गोष्टी कोणत्या आहेत.
‘टायगर ३’ हा चित्रपट कतरिना कैफ व सलमान खान यांचा बहुचर्चित असलेला चित्रपट दिवाळी दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी रविवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट पाहण्यासाठी रविवारची सुट्टी असल्यामुळे प्रेक्षकांनी गर्दी केली होती.सलमान व कतरिनाच्या यांचा ‘टायगर जिंदा है’ व ‘एक था टायगर’ नंतर प्रेक्षक या चित्रपटासाठी किती गर्दी करतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागलं होतं.
एक नवा रेकॉर्ड नुकतंच ‘टायगर ३’ने रचल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘टायगर ३’ हा दिवाळीच्या दिवशी हिंदी चित्रपटाच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.जगभरात तब्बल ९४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.बाहेरील देशांमध्ये या चित्रपटाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४१.५० कोटींची आणि भारतातील एकूण कमाई ही ५२.५० कोटी कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई करून असूनसुद्धा या चित्रपटावर बरीच टीका होत असताना दिसत आहे.मिश्र प्रतिक्रिया आपल्याला प्रेक्षकांच्या पाहायला मिळत आहेत.
सलमान खानचा चित्रपट म्हणलं की त्यामध्ये मनोरंजन आणि ॲक्शन हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्याबद्दल कुठलीच कमतरता नाहीये प्रेक्षकांना या चित्रपटातील काही गोष्टी खूपच खटकले आहेत त्यामुळे सलमान खानच्या(Salman Khan) या चित्रपटावर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.‘टायगर ३’ हा चित्रपट अजिबात पाहू नये या ४ गोष्टीमुळे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया त्या ४ गोष्टी कोणत्या आहेत.
१. कमकुवत पटकथा आणि लिखाण :
प्रेक्षकांची म्हणणे असे आहे की सलमान खानच्या ‘टायगर ३’च्या स्टारडमवर पैसा कमावण्याच्या नादात निर्मात्यांनी लिखाणावर व पटकथा यावर अजिबात त्यांनी मेहनतच घेतली नसल्याची तक्रार करत आहेत. प्रेक्षकांनी असे म्हटले आहे की श्रीधर माधवन आणि आदित्य चोप्रा यांनी लिहिलेली कथा ही खूपच विस्कळीत आणि कमकुवत असल्याचं म्हटल आहे.
२. सलमानच्या धासु डायलॉग्सचा अभाव :
सलमान खानचे चित्रपट म्हंटलं की ‘वॉन्टेड’पासून ‘किक’, ‘दबंग’पर्यंत त्यात टाळ्या शिट्टी मिळवणारे डायलॉग असणार हे ठरलेलंच असतं. ही गोष्ट 'टायगर ३' मध्ये कटाक्षाने टाळणे प्रेक्षकांचा हिरमोड झाल्या असले तर सांगितलं जात आहे. या चित्रपटामध्ये “जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं” हा एक दमदार डायलॉग सोडला तर असा एकही डायलॉग नाही प्रेक्षकांच्या लक्षात राहील. वेगळे डायलॉग या चित्रपटात नसल्यामुळे प्रेक्षक निराश झाले असल्याचं समोर आला आहे.
३. पाकिस्तानचे गुणगान :
सोशल मीडियावर या चित्रपटात पाकिस्तानचे गोडवे गायले असल्यामुळे बरेच लोकांना ते खटकलं असल्याचं त्यांनी नमूद केला आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तान हा शांतीप्रिय देश असल्याचा दाखवण्यात आला आहे.टायगर हा रॉचा एजेंट आयएसआयच्या सोबतीने पाकिस्तानच्या लोकशाहीचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा बचाव करताना या चित्रपटांमध्ये दाखवला आहे. पाकिस्तानचे गोडवे गायल्यामुळे बरेच प्रेक्षक नाराज झाले आहेत.कमर्शियल चित्रपटात अशा प्रकारचं राजकीय भाष्य त्यांच्या पसंतीस न उतरल्याने त्यांनी यावर टीका केली आहे.
४. सर्वात कमकुवत खलनायक :
शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाच्या बाबतीत जॉन इब्राहिम सारख्या दमदार विलन ने चित्रपटाला उचलून धरलं होतं म्हणूनच कदाचित या विलन मुळे शाहरुख खानचा अभिनय अधिक कुठून दिसला होत.
‘टायगर ३’ या चित्रपटांमध्ये इमरान हाशमीच्या पात्राकडे कानाडोळा झाला असेल आणि फक्त सगळं लक्ष सलमानवरच आहे असे प्रेक्षक म्हणत आहेत.इम्रान हाशमी हा अत्यंत ताकदीचा नट आहे.लेखक आणि दिग्दर्शक एक खलनायक म्हणून सलमानसमोर त्याला उभं करण्यात कमी पडले असल्याचं कित्येकांनी स्पष्ट केलं आहे.
सलमानसह कतरिना कैफ, इम्रान हाशमी यांच्या प्रमुख भूमिका ‘टायगर ३’मध्ये आहेत.शाहरुखच्या कॅमिओचीही जबरदस्त चर्चा चित्रपटातील आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीनही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.