पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००८ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी फरार गुंड आशिष जाधव याला पोलिसांनी अटक केली होती.
2008 पासून तो शिक्षा भोगत होता तर त्याची नेमणूक रेशन विभागात काम करण्यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाने केली होती. हे काम करत असताना तो पळून गेल्याचे पोलिसांना संशय आहे.
सोमवारी दुपारी अधिकारी कैद्यांची मोजणी करत असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आहे. आरोपी आशिष हा कुठेच आढळून न आल्याने शोध घेतली असता. इतर कैदी त्याच्या बद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपी जाधव याच्या शोधात पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.